रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ही जोडी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेट वर भेटली होती तर तेव्हापासून ते आतापर्यंत ते दोघे सोबतच आहेत. रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाचे कार्यक्रम हे 13 एप्रिल पासूनच सुरू होऊन जातील आणि ते दोघेही ऋषी कपूरच्या वडिलोपार्जित घरात लग्न करतील.
जसे म्हणले जाते की, बरोबर शोधण्यासाठी, तुम्हाला काही चुकीच्या लोकांना देखील भेटावे लागते. रणबीर सोबत काहीसे असेच झाले मात्र त्याने प्रेमात पडण्याची आशा सोडली नाही. चला तर मग त्या वेळेत आपण जाऊया जेव्हा रणबीर म्हणाला होता की तो कोणाच्या तर प्रेमात पडेल आणि पागल होऊन जाईल.
करण जोहरचा गप्पांचा कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ मध्ये आपल्या उपस्थिती दरम्यान, रणबीर ने प्रेम, एकटेपणा आणि आपल्या चित्रपटांबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. तो गप्पांच्या कार्यक्रमात रणवीर सोबत दिसला होता. करण सोबत बोलताना रणबीर म्हणाला होता की, ‘एकटं असणे हा एक पोकळ अनुभव आहे आणि प्रेम असण्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. मी कोणाच्या तरी प्रेमात डूबून पागल होणार आहे. ‘
यादम्यान, जर आगामी येणाऱ्या कामाबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर पुढच्या वेळेस आलिया भट्ट सोबत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट त्यांचा पहिल्यांदाच एकत्र असलेला चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी ने केले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपट या वर्षी 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.